

Nilanga Soybean Crop Crisis Farmers Report 100 Percent Loss Due To Rainfall Deficit Agriculture Department Shows 70 Percent
esakal
-राम काळगे
निलंगा : यंदाच्या खरीप हंगामातील पीके पावसा अभावी पूर्णतः हातून गेल्याने दुष्काळाची स्थिती गंभीर बनली आहे. सर्वच पिकिचे शंभर टक्के नुकसान झाले असताना कृषी विभागाच्या अहवालात सत्तर टक्केच नोंद; दाखवण्यात आल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा तर दुसरीकडे कृषी विभागाची मनमानी आकडेवारी यामुळे शेतकरी हादरून गेला आहे. आता आम्हाला वाली कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.