निलंगा : मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

पाणी पात्राबाहेर, नदीकाठच्या पीकाठचे पीके गेली वाहून, जमिनीही गेल्या खरडून
निलंगा : मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली
sakal

निलंगा : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरूवारी ता. 23 रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले असून मांजरा धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आल्याने शनिवारी ता. 25 रोजी मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाण्याच्या अतिप्रवाहामुळे पाणी नदीच्या पात्राबाहेर पडले असून यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले आहे. शिवाय जमिनीही खरडून गेल्या असून तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

निलंगा : मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली
‘आतून आले’ तर युपीएससीकडे वळा : शुभम नागरगोजे

मागील कांही दिवसापासून शहरासह तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस होत असून या पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. शिवाय या पावसामुळे तालुक्यातील लघू व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धनेगाव ता. केज येथील मांजरा धरणाचे बारा दरवाजे उघण्यात आल्याने मांजरा नदीपात्राच्या बाहेर पाणी पडले असून मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीपात्राच्या बाहेर पाणी पडल्याने नदीकाठच्या शेतातील सोयाबीन, तूर, ऊस, या पीकाचे नुकसान झाले असून पीके पाण्यात वाहून गेली आहेत.

तर कांही शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी या पाण्यामध्ये वाहून गेल्या असून या पाण्याचा फटका निलंगा तालुक्यातील शेंद, निटूर, ढोबळेवाडी, बसपूर, शिरोळ-वांजरवाडा, गिरकचाळ, होसूर, नदीवाडी, हंचनाळ यासह आदी गावाना बसला आहे. शिवाय मांजरा नदीला आलेल्या पूराचा फटका निलंगा, शिरूरअनंतपाळ व देवणी या तालुक्यातील गावाना सर्वाधिक बसला आहे.

काही शेतकऱ्यांचे गोठ्यातील औजारे वाहून गेली असून पाण्याच्या अतिप्रवाहामुळे ऊसामध्ये पाणी जावून आडवा पडला आहे. शिवाय या पाण्यामुळे गिरकचाळ येथील कोल्हापूरी पध्दतीचा बंधारा पाण्याखाली गेला असून रस्ता बंद झाला आहे. तर बसपूर-बाकली येथील पुलावरून पाणी पडल्याने शिरूरअनंतपाळ तालुक्याला जाणारा मार्ग बंद झाला आहे.

तर माकणी ता. लोहारा येथील धरण भरण्याच्या मार्गावर असून तेरणा नदीपात्रात कोणत्याही वेळी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहीती उपविभागीय आधिकारी पाटबंधारे उपविभाग क्रमांक तीन लातूर यांनी दिला आहे. दोन दिवसापूर्वीच तालुका प्रशासनाने मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. नदीपात्राच्या पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांनी व गावांना सतर्क रहावे याबाबत पोलिसपाटी, तलाठी यांना सूचना देण्यात आल्याची माहीती तहसीलदार गणेश जाधव यांनी दिली.

तालुक्यातील निलंगा, आंबुलगा, औरादशहाजानी, निटूर, पानचिंचोली, कासारसिरसी या महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. असाच उर्वरीत पुढील दिवसात पाऊस पडत राहील्यास रब्बी हंगामाला हा पाऊस पोषक मानला जात आहे. मात्र सुरवातीच्या काळात पेरणी झालेल्या खरिप हंगामातील सोयाबीन पीक कांही भागात काढणीला आले असून याचे नुकसान होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com