औरंगाबाद - खरेदीसाठी बाजारपेठेत जा, की रुग्णालयाजवळ दुचाकी लावा, जिकडे तिकडे गर्दीच गर्दी. माणसांच्या संख्येपाठोपाठ वाहनांची संख्याही प्रचंड वाढल्याने पार्किंगच्या अडचणींचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. त्यात भरीस भर म्हणून हीच वाहने टोइंग वाहनामुळे उचलले जात असल्याने नागरिकांना दुहेरी मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरात पार्किंगचा प्रश्न कायम आहे. पार्किंग-नो पार्किंग झोनचा पत्ता नाही, रस्त्यावर येलो मार्किंग नाही. परिणामी, वाहन उचलेगिरीलाही संधी प्राप्त झाली आली.
औरंगपुरा, गुलमंडी, शहागंज बाजारपेठ असो, की टीव्ही सेंटर, सिडकोतील मोक्याची जागा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी बॅरिकेड्स लावून पोलिस त्यांच्या पातळीवर उपायही करीत आहेत; परंतु वाहनांची संख्या एवढी वाढली, की पार्किंगसाठी असलेली जागा भरली, की त्याच्या बाजूला लागणारे वाहन उचललेच म्हणून समजा. पार्किंगचा प्रश्नच एवढा गंभीर आहे, की वाहनधारकांना त्यांचे वाहन कोठे लावावे हा प्रश्न आहे. रस्त्याच्या कडेला डांबरी रस्त्यांच्या खाली दूरपर्यंत अडथळा नसलेली वाहनेही उचलण्याचे काम वाहतूक पोलिसांकडे कामाला असलेल्या तरुणांकडून होते. विशेषत: वाहन उचलल्यानंतर अशी कारवाई केल्याचे त्या जागी कोणतीही माहिती, खूण ठेवली जात नाही. परिणामी, वाहनधारकांना वाहन चोरी झाल्याची शक्यताच अधिक वाटते. मग त्यांची धावाधाव सुरू होते. कुटुंबातील सदस्यांना तिथेच सोडून किंवा रिक्षाने घरी पाठवून वाहन मिळवण्यासाठी पोलिस ठाण्याकडे धाव घेण्याची वेळ अनेकांवर येत आहे. बाजारपेठेत गर्दीमुळे रस्त्याच्या कडेला वाहनांचीही झालेली गर्दी वाहन उचलणाऱ्या वाहतूक विभागासाठी संधी ठरत आहे.
पार्किंग सुविधाच नाही
या उपायांची गरज
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.