

कांद्याचे झाले 'वांधे'! गंगापूर तालुक्यात मजूर टंचाई आणि घसरलेल्या दरांमुळे शेतकरी संकटात; उत्पादन खर्च निघणेही झाले कठीण
Sakal
कायगाव : गंगापूर तालुक्यात रब्बी हंगामातील कांदा काढणीच्या कामांनी वेग घेतला आहे. मात्र सर्वच शेतकऱ्यांची काढणीची कामे एकाच वेळी आल्याने मजुरांची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यातच बाजारात कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.