अतिवष्टीचे सव्वासहा कोटी परत जाण्याच्या मार्गावर; बहुभूधारक शेतकऱ्यांना लाभ नाही

rain
rain

उस्मानाबाद: अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सुमारे सव्वा सहा कोटी रुपयांचा मदत निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. शासन दरबारी बहुभूधारक शेतकऱ्यांचा आर्थिक मदत देण्याची तरतूद नसल्याने हा निधी आता परत जाण्याच्या मार्गावर आहे. लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

गेल्या वर्षी अतिवृष्टीने जिल्ह्यात शेती आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली. अगदी एकाच दिवसात लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात आले.

प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करून शासनाकडे पाठविली. जिल्ह्यात सुमारे तीन लाख ४५ हजार ६८४ शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच शेतीचे कोट्यावधी रुपयांचा नुकसान झाले. त्यामुळे शासनाने अशा शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली. जिल्हा स्तरावर मदतनिधी प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक तालुक्याला रक्कम वर्ग करण्यात आली. आतापर्यंत २४७ कोटी ४६ लाख ८७ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

बहुभूधारक शेतकरी नाहीत का?
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्याचे निश्चित झाल्यानंतर जिल्हा स्तरावर निधी आला. अतिवृष्टीमुळे जमीन वाहून जाण्याचा प्रकार अनेक वर्षानंतर घडला आहे. मात्र बहुभूधारक शेतकऱ्यांना जमीन खरडून गेल्यानंतरही मदत देता येत नाही. जिल्ह्यात सुमारे दोन हजार ४१९ शेतकरी हे बहुभूधारक असून त्यांची जमीन खरडून गेली आहे. त्यांच्यासाठी सुमारे सहा कोटी ३६ लाख १३ हजार रुपयांचा निधी जिल्हा स्तरारव प्राप्त झाला आहे.

मात्र बहुभूधारक शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासन आदेशात उल्लेख नसल्याने जमीन खरडून जाण्याचे या शेतकऱ्यांना मदत मिळू शकलेली नाही. त्यामुळे आता मार्चअखेरीस हा निधी परत शासनाकडे जाण्याचे संकेत आहेत. बहूभूधारक असूनही कायम अवर्षणग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची स्थिती फारसी चांगली नसते. त्यामुळे बहुभूधारक असतानाही त्यांना मदत मिळावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकप्रतिनीधींनी प्रयत्न करावेत
सातत्याने दुष्काळाच्या खाईत अडकलेल्या जिल्ह्यातील बहुभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बेताचीच असते. निधी येऊन परत जाणे, हे जिल्ह्यासाठी भूषणावह नाही. त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून आदेश काढावेत. व वंचित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com