

Paithan Gevarai Marda farmer destroys 400 pomegranate trees with JCB due to oily disease outbreak and crop loss
Sakal
मुनाफ मुमताज आजीज शेख
आडूळ : पैठण तालुक्यात डाळींब बागांवर 'तेल्या' रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, उत्पादनावर झालेल्या गंभीर परिणामामुळे बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या नैराश्यातून गेवराई मर्दा येथील एका शेतकऱ्याने तब्बल ४०० डाळींबाच्या झाडांवर जेसीबी फिरवून अनेक वर्षांची मेहनत एका दिवसात उद्ध्वस्त केली. या घटनेमुळे परिसरातील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.