परभणीत उन्हाचा पारा वाढला; सुती रुमालासह टोप्यांची मागणी वाढली

file photo
file photo

परभणी : जिल्ह्याभरात तापमानाचा पारा आता वर चढण्यास सुरुवात झाली आहे. मार्च महिण्याच्या सुरुवातीच्या आठवड्यातच वाढत्या तापमानाची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उन्हापासून स्वताचा बचाव करण्यासाठी परभणी शहरात पांढऱ्या रंगाच्या सुती रुमालाला मागणी वाढली आहे. केवळ रुमालच नाही तर टोपीची मागणी देखील ग्राहकांकडून होत असल्याचे दिसत आहे.

परभणी जिल्हा हा तापमानाच्या बाबतीत सर्वात पुढच्या रांगेत असतो. गेल्या काही वर्षापासून जिल्ह्याचे तापमान कमालीचे वाढत आहे. अगदी 45 ते 46 अंशा पर्यंत तापमानाचा पारा या जिल्हयात वर चढलेला असतो. सध्या कमाल तापमान 36 ते 37 अंशावर आहे. सकाळचे तापमानही 14 ते 15 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. त्यामुळे यंदा उन्हाचा पारा जिल्हयात निश्चितच सातत्याने वाढलेलाच असणार आहे यात दुमत नाही. परंतू उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरीकांनी सुती रुमालाची मागणी वाढवली आहे. त्यामुळे वाढती मागणी लक्षात घेवून विक्रेत्यांनी ही त्या प्रमाणे रुमाल विक्रीसाठी आणले आहेत. यात प्रामुख्याने सुती रुमालाला जास्त मागणी असल्याने सुती रुमाल पांढऱ्या व इतर रंगातही तसेच वेगवेगळ्या डिझाईनमध्ये देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

टोप्याची दुकाने सजली

लहान मुले किंवा तारूण्यातील मुलांना टोप्यांचे आकर्षण अधिक असते. त्यामुळे विविध रंगाच्या टोप्या ही बाजारात आलेल्या आहेत. अगदी 30 रुपयापांसून ते 200 रुपयांपर्यंतची टोपी सध्या बाजारात उपलब्ध आहेत. शहरातील शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क व इतर बाजारपेठेतील कपड्याच्या दुकानांवर टोप्या आलेल्या आहेत.

विविध कूलर उपलब्ध

एक हजार रुपयांपासून 12 हजार रुपयापर्यंत विविध कूलर उपलब्ध आहेत. अगदी 60 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत टोपी, गॉगल्स ही वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहेत. उन्हाळ्यात पाणीप्रश्न सर्वांना भेडसावत असतो. दरवर्षी उन्हाळा फेब्रुवारी अखेर अनेकांच्या घरी असलेल्या कूपनलिका, हातपंपाचे पाणी खोल जाते. काही स्त्रोत मार्च महिण्यात कोरडे पडतात. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होते. पाणी साठवणुकीसाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जातात. सिमेंटच्या हौदाऐवजी आता थेट टाक्या आणल्या जात आहेत. त्यामुळे टाक्यांना मागणी वाढली आहे.

फळांनी सजली बाजारपेठ

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी विविध प्रकारची फळे बाजारात दाखल झाली आहेत. द्राक्षे, खरबुज, टरबुज यांच्यासह किवी, चिकू आदी फळांची आवक वाढलेली आहे. शहरातील विविध रस्त्यावर आणि भाजी मार्केटमध्ये फळे उपलब्ध झाली आहेत. शहराबाहेरदेखील रस्त्यावर रसवंत्या दिसू लागल्या आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com