

Parbhani News
esakal
परभणी: महानगरपालिकेच्या गाळे भाडेवाढीचा प्रश्न २०१६-१७ पासून प्रलंबित होता. परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्याने भाडेवाढीचा तिढा सुटण्याची शक्यता असून, त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. गाळेधारक न्यायालयीन आदेशाप्रमाणे अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत.