

Parbhani News
esakal
परभणी: शहरातील बहुतांश रस्त्यांवर पादचारी मार्गांचे अस्तित्वच नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने पादचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर तर सोडून दिलीच आहे, त्याचबरोबर नगरविकास विभागाच्या पत्रालादेखील केराची टोपली दाखवली आहे. या संदर्भात जागरूक नागरिकांनी एक मे रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.