

Parbhani News
esakal
परभणी: जिल्ह्यासह शहरात सोमवारी (ता. ३०) रात्री आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला बसला आहे. त्यामुळे व विद्यानगर येथील एमबीआरच्या (प्रमुख पाण्याची टाकी) दुरुस्तीमुळे पुढील चार ते पाच दिवस शहराच्या निम्म्यापेक्षा अधिक भागांचा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. नागरीकांना भर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.