

Parbhani News
esakal
परभणी: उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, या संकटाचा फायदा घेत खासगी टॅंकरचालकांनी नागरिकांची अक्षरशः लूट सुरू केली आहे. जीवनावश्यक असलेल्या पाण्यासाठी आता नागरिकांना तब्बल ५०० रुपये मोजावे लागत आहेत. एका दिवसांतच ४०० रुपयांवरून थेट ५०० रुपयांपर्यंत दरवाढ केल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.