

Jalna News
esakal
परतूर: उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामीण भागातील अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. मे महिन्याच्या मध्यातच भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने शेतकरी व ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. विहिरींमध्ये अत्यल्प पाणी शिल्लक राहिले असून काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत.