Maharashtra farmer concerned about CIBIL score under the Punyashlok Ahilyadevi Holkar loan
esakal
हिंगोली : राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने' अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी या योजनेची अंमलबजावणी वन टाइम सेटलमेंट (OTS) पद्धतीने होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांच्या सिबिल (CIBIL) स्कोअरवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने सर्व बँकांना स्पष्ट लेखी निर्देश देऊन शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोअरचे संरक्षण करावे, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन कावरखे यांनी केली आहे.