कडाक्याच्या थंडीने तुटला रेल्वे रुळ; मोठा अनर्थ टळला

Aurangabad
Aurangabad

औरंगाबाद : लासूर पोटूळ रेल्वेस्थानकादरम्यान बुधवारी (ता. 30) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वे पटरी तुटली. भरधाव वेगात जनशताब्दी एक्सप्रेस निघून गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. ही घटना वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.

जनशताब्दी एक्सप्रेसच्या गार्डने पटरी तुटल्याचे लक्षात येताच, ही माहिती लासुर रेल्वे स्थानकाला आणि नांदेड नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर गँगमन कर्मचारी तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आला. गँगमनच्या सुचनेनुसार तुटलेल्या पटरीवरून तिरुपती नगरसोल एक्सप्रेस, नगरसोल नांदेड पॅसेंजर, जालना नगरसोल आणि मनमाड काचिगुडा पॅसेंजर या गाड्या शुन्य किलोमीटर वेगाने चालवुन काढण्यात आल्या.

गॅंगमन कर्मचारी तुटलेल्या पटरीच्या ठिकाणी थांबून रेल्वे हळूहळू काढण्यासाठी मदत करत आहे. दुपारनंतर पटरीची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com