Raju Shetty : आता शेतकऱ्यांनो, आपली वज्रमूठ करा : राजू शेट्टी; जातिधर्माच्या पलीकडे जाऊन एकत्र आलो पाहिजे

Breaking Barriers: ओव्यांमधून राष्ट्रसंतांनी शेतकऱ्यांच्या व्यथा प्रभावीपणे मांडल्या आहेत. हा विचार केवळ पुस्तकात न राहता कृतीत उतरावा, यासाठी सामूहिक प्रयत्नांची तयारी असली पाहिजे, असे यावेळी आध्यात्मिक गुरुकुलचे संचालक व आयोजक रवी मानव यांनी स्पष्ट केले.
Raju Shetty

Raju Shetty

sakal

Updated on

तिवसा, (जि. अमरावती): ‘‘वयाच्या पंचविशीत आम्ही शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरू केला आणि आज साठी ओलांडूनही तो थांबलेला नाही. सरकारे बदलली, धोरणे बदलली, पण शेतकऱ्यांची अवस्था मात्र बदलली नाही. म्हणूनच आता प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःची ‘वज्रमूठ’ तयार ठेवली पाहिजे. जाती, धर्म, पंथ, पक्ष यांच्या पलीकडे जाऊन एकत्र आल्याशिवाय शेतीचे प्रश्न सुटणार नाहीत,’’ असे परखड मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com