परळी वैजनाथ - शिक्षक, कर्मचार्यांना ई-केवायसी करण्यासाठी आता मे अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे शासन परिपत्रक वित्त विभागाने जारी केले आहे. यामुळे शिक्षक, कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे..वेतन मिळणार्या बँक खात्याची ई-केवायसी केल्याशिवाय एप्रिल महिन्याचे वेतन दिले जाणार नाही, असा सज्जड दम प्रशासनाने दिल्याने शिक्षक, कर्मचार्यांची ई-केवायसी करण्यासाठी गेल्या कांही दिवसांपासून बँकेत अक्षरशः तुंबड पडली होती.जनगणनेचे काम, त्याचे प्रशिक्षण, पॅटच्या परीक्षा, पेपर तपासणी, त्याचा निकाल, निकाल ऑनलाईन करणे, चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी, मतदार याद्या पडताळणी, येवू घातलेले दुसरे ते चौथीच्या नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण आणि इतर दैनंदिन कामे. या सर्व कामाच्या ओझ्यामुळे शिक्षक सध्या मोठ्या तणावात आहेत. ही कामे करण्यासाठी त्यांना दिवसरात्र एक करावा लागत आहे..या सर्व कामांमुळे उन्हाळ्याच्या सुट्टयांवर शिक्षकांना पाणी सोडावे लागले आहे. यामुळे सुट्टयांचा आनंद यंदा त्यांना उपभोगता येणार नाही, या कारणाने हिरमोड झालेल्या शिक्षकांना ई-केवायसी करण्याचा सज्जड दम मुख्याध्यापकांनी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या परिपत्रकाचा हवाला देत दिला होता..ई-केवायसी केल्याशिवाय एप्रिल महिन्याचे वेतन दिले जाणार नाही, असे स्पष्ट सांगितल्याने शिक्षक मोठे चिंताग्रस्त झाले. ई-केवायसी करण्यासाठी वेतन मिळणार्या बँकेत त्यांनी मोठी गर्दी केली. बँक उघडण्याअगोदरच शिक्षक, कर्मचार्यांची गर्दी बँकेच्या दारात होत होती. तासनतास या कामासाठी त्यांना बँकेत अशा उन्हाळ्यात, उन्हामुळे होणार्या उकाड्यात हैराण होत बँकेत रांगेत थांबावे लागले. तीन-तीन, चार-चार तास यासाठी लागत असल्याने शिक्षक, कर्मचार्यांची मोठी गैरसोय झाली. शेकडो शिक्षक ई-केवायसी करण्यासाठी बँकेत येत असल्याने बँक कर्मचार्यांचीही मोठी गैरसोय झाली. शिक्षक, कर्मचार्यांची ई-केवायसी करता करता बँक कर्मचार्यांची दमछाक उडाली..परळीच्या गांधी मार्केट भागातील एसबीआय बँकेच्या शाखेतून तालुक्यातील असंख्य शिक्षक, कर्मचार्यांचे वेतन होते. त्यामुळे या शाखेत मोठी गर्दी पडली. अपुरे कर्मचारी, अपुरी यंत्रणा यामुळे बँक कर्मचार्यांवर मोठा ताण पडला. निकालाचे काम करावे की ई-केवायसी करावी या विवंचनेत शिक्षक, कर्मचारी होते. याबाबत दैनिक ‘सकाळ’ मधून वृत्त प्रकाशित झाले..राज्य शासनाच्या वित्त विभागाने ई-केवायसी करण्यासाठी मे अखेरपर्यंत मुदत वाढवली आहे. सदरची मुदत सर्व जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदानित, अशासकीय प्राथमिक, माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग (शालार्थ प्रणाली) आदी ठिकाणी काम करणार्या शिक्षक, कर्मचार्यांसाठी लागू राहील असे या पत्रकात म्हटले आहे. यामुळे शिक्षक, कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.