
छत्रपती संभाजीनगर : सावकाराच्या पाशात अडकू नये असं म्हणतात ते अगदी खरं आहे. परंतु, पाशात अडकलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना सहकार विभागाने केवळ मुक्तच केले नाही, तर जानेवारी २०२५ अखेर छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांतील १६७ शेतकऱ्यांच्या तब्बल ३३७ एकर जमिनी परत मिळवून देण्यास सहकार विभागाला यश आले आहे. यात सहकार विभागाला फौजदारी कारवाया करत ४६ सावकारांविरोधात गुन्हेही दाखल करावे लागल्याचे समोर आले आहे.