

परभणी : राज्यात घडणाऱ्या विविध घटनांतून दिवसेंदिवस क्रौर्य वाढत आहे. कायद्याचा धाक राहिला नाही. लोक बेधडकपणे गुन्हे करत आहेत. हे धैर्य येते कुठून? गुन्हेगारी मानसिकतेला आळा घालण्यासाठी समाजाने एकजूट होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी (ता.नऊ) व्यक्त केले.