

जालना : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये उन्हाचा पारा ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोचला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी योग्य काळजी घेत उपाययोजना न केल्यास उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी केले.