हिंगोलीत रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा चाप, संचारबंदीचा दुसरा दिवस

file photo
file photo

हिंगोली :  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी  सात दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत नागरिकांनी विनाकारण रस्त्यावरून फिरू नये, अशा सूचना दिलेल्या असतानाही काहीजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे मंगळवारी (ता. दोन) रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्या काही नागरिकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. शिवाय रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या वाहनांचीही पोलीस प्रशासन व नगरपालिकेच्या पथकाद्वारे तपासणी केली जात आहे.

जिल्ह्यात सोमवारपासून सुरू झालेल्या संचारबंदी दरम्यान कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, आवश्यकता असल्यास प्रशासनाची मदत घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिवाय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तशा सूचनाही दिल्या आहेत. 

जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्हाभरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मंगळवारी शहरातील गांधी चौक भागातून  काही जण दुचाकीवरून विनाकारण फिरताना पोलिसांना आढळून आले. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता सदर इसमानी दुचाकीवरून पळ काढला यावेळी पोलिसांनी त्यांना चांगलाच चोप दिला. संचारबंदी दरम्यान नागरिकांनी घराबाहेर विनाकारण पडू नये शिवाय रस्त्यावरूनही फिरू नये असे आवाहन  जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरातील प्रत्येक  चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त तैनात असून ये- जा करणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे कर्तव्यावर हजर होण्यासाठी ये- जा करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे ओळखपत्र आहे किंवा नाही याची तपासणी  पोलिस अधिकारी व कर्मचारी करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com