

Ground Report: Severe Water Crisis Destroys Sweet Lime Orchards in Adul Belts
Sakal
आडूळ : आडूळ सह परिसरात यंदा उन्हाची तीव्रता वाढल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील लहान-मोठे तलाव, पाझर तलाव, बंधारे आणि विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसमोरील संकट अधिक गडद झाले आहे. विशेषतः मोसंबी, डाळिंब, आंबा आदी फळबागांना पाण्याअभावी मोठा फटका बसत असून अनेक शेतकऱ्यांवर स्वतःच्या हाताने फळबागा तोडण्याची वेळ आली आहे.