दुष्काळाची छाया होतेय गडद 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बीड - जिल्ह्यात मॉन्सूनचे साडेतीन महिने संपले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 42 टक्केच पाऊस झालेला आहे. मॉन्सूनचे फक्त 15 दिवस उरले असून जिल्ह्यात परत दुष्काळ उंबरट्यावर आला आहे. यामुळे सध्या जिल्हाकर चिंताग्रस्त झालेल्याचे दिसत आहे.

गेल्यावर्षीचा दुष्काळ जिल्हाकरांनी कसाबसा सहन केला; परंतु यंदाही दुष्काळ पडला तर तो सहन करण्याची शक्ती आता जिल्हाकरांमध्ये राहिलेली दिसत नाही. जिल्ह्यात 666.36 मिमी सरासरी पाऊस पडत असतो; परंतु गेल्यावर्षी सरासरीच्या तुलनेत फक्त 50 टक्केच पाऊस पडला. यामुळे जिल्हाकरांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागला होता.

यंदा तरी जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल, अशी आशा जिल्हाकरांना होती; परंतु आता पर्यंत जिल्ह्यात समाधान कारक पाऊस पडलेला नाही. आता फक्त पावसाचे 15 दिवस शिल्लक राहिले असून, 144 प्रकल्पांपैकी 104 प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. यासह 29 प्रकल्प जोत्याखाली आलेले आहेत. फक्त नऊ प्रकल्प 25 टक्के पाणीसाठ्यात सध्या उरलेले आहेत. 25 ते 50 टक्‍क्‍यांत अवघे दोन प्रकल्प राहिले आहेत.

जिल्ह्यातील प्रकल्पात सध्या फक्त 0.62 टक्केच पाणी साठा शिल्लक राहिलेला आहे. पंधरा दिवसात तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडावा, अशी अपेक्षा जिल्हावासीयांना आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com