हिंगोली : जिल्ह्यात वाढत्या तापमानाने धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. हिंगोली, वसमत व पूर्णा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील सिध्देश्वर धरणाने तळ गाठला असून जिवंत पाणीसाठा शुन्यावर आला आहे.
औंढा तालुक्यातील सिध्देश्वर धरणातून हिंगोली, वसमत व पुर्णा शहराला पाणी पुरवठा केला जातो. तसेच कालव्याद्वारे ६० हेक्टर सिंचनासाठी या धरणातून पाण्याचे आवर्तन दिले जाते. या धरणातून शेतीसाठी पाण्याचे चार आवर्तन दिले जातात आतापर्यंत दोन वेळा पाणी देण्यात आले आहे. सध्या धरणात १६८.८२६ दलघमी पाणी पातळी आहे. ८०.९६ केवळ पाणीसाठा आहे
तर धरणात जीवंत पाणीसाठा शुन्यावर तर मृत १६५.७९ दलघमी पाणीसाठा असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यात ईसापूर धरणात सध्या ४९.८७ तर येलदरी धरणात २९.७५ टक्के पाणीसाठा आहे. यासह अकरा लघु प्रकल्प जोत्याखाली आले आहेत. १४ प्रकल्पातील पाणीसाठा २३ टक्क्यावर आला आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसापासून तापमान ४२ अंशावर आहे. या वाढलेल्या तापमानाने पाणी पातळी कमालीची घटत चालली आहे. दरम्यान, हिंगोली तालुक्यातील अंधारवाडी व बळसोंड येथे टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.येलदरी धरणातून सिध्देश्वर धरणात पाणीसाठा केला जाणार असल्याची तयारी केली जात असल्याचे अभियंता निसार अहेमद यांनी सांगितले
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.