

Beed News
esakal
किल्ले धारूर: बालाघाटच्या डोंगररांगांमध्ये वसलेले धारूर शहर म्हणजे निसर्ग, अध्यात्म आणि पराक्रमाचा एक अद्भूत संगम. मात्र, याच डोंगरदऱ्यात दडलेला आपला अमूल्य वारसा आज काळाच्या ओघात हरवत चालला की काय, अशी भीती वाटू लागली आहे. शहराच्या उत्तरेला गोपाळपूर मार्गावर वसलेले ‘सीतेची न्हाणी’ हे पौराणिक स्थळ आज प्रशासकीय दुर्लक्षामुळे ओसाड होत असून, येथील ऐतिहासिक पाऊलखुणा पुसल्या जात आहेत. वनवासात असताना माता सीतेने ज्या ठिकाणी स्नान केले, अशी धारणा असलेले हे स्थळ आणि येथील बारमाही वाहणारा गरम पाण्याचा झरा आज जतन आणि संवर्धनासाठी साद घालत आहे.