शेतात काहीच करमना गेलंय, सोयाबीन पण हाती लागणार नाही?

Soybean
Soybean

उजनी(जि.लातूर) : शेतात काहीच करमना गेलय, सोयाबीन पण हाती लागणार नाही असंच दिसतय. मीरगात पाऊस चांगला झाला म्हणून आनंदाने पेरणी केली. पीक चांगलेही आले. पण ऐन शेंगात दाणे भरण्याच्या वेळेला पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतात नुसतं रख रखं वाटतय. बसू वाटत नाही. लई अवघड झालय. पांडुरंगा परमेश्वरा पाऊस पडू दे रे बाबा, या शब्दांत व्यथा सांगत आहेत शेतकरी. उजनी परिसरातील (ता.औसा) कालचा आनंदित शेतकरी आज मात्र चिंतेच्या गर्तेत सापडलेला दिसून येत आहे. त्याला कारणही तसेच आहे.


परिसरात सोयाबीन पिकाला शेंगाची काही प्रमाणात लागण तर दिसू लागली आहे. परंतु पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे त्यामध्ये दाणे तयार होत नसल्याचे पाहायला मिळाले. शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत पाऊस नसल्यामुळे येथील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत येथे जेमतेम पाऊस पडला. ज्याचा सोयाबीन वाढीसाठी व शेंगाची लागण होण्यासाठी फायदा झाला. परंतु ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून पावसाने ओढ दिली असून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे सोयाबीन पिक सुकू लागल्याने पिक हातचे जाण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.


उजनी परिसरात खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन पिक विविध कारणासाठी चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. कधी बियाणे उपलब्ध नसल्यामुळे, कधी पेरलेले बियाणे उगवले नाही. त्यामुळे कधी पिकाची अपेक्षेपेक्षा जास्त उंची वाढल्यामुळे तर कधी शेंगाचीच लागण झाली नसल्यामुळे! ही मालिका कायम ठेवत सोयाबीन पीक आता शेंगा लागल्या, परंतु पावसाअभावी त्यामध्ये दाणे तयार होत नाही.

सततच्या पावसामुळे उडीद व मूगाचे मातेरे झाल्यानंतर उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातून चांगल्या प्रमाणात उत्पादन मिळेल ही अपेक्षा होती, परंतु असे होताना दिसत नसून शेतकऱ्यांच्या पदरी नेहमीप्रमाणे निराशाच पडण्याची चिन्हे आहेत. सोयाबीन पिकातून हाती काही न लागल्यास शेतकरी मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. बँकेच्या कर्जाची हप्ते थकित असल्याने कर्जाचा बोजा वाढतच असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अरे बाप ! एकशे पासष्ट कुटुंबाच्या गावात कोरोनाबाधितांची संख्या एवढी !

शेतकरी व नुकसान एक नवीन समीकरण
अलीकडे शेतकरी व नुकसान असे एक नवीन समीकरण उदयास आलेले पाहायला मिळत आहे. शेतकरी हा कायम अडचणीत सापडलेला दिसून येतो. कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी शासनाच्या शेती संदर्भातील उदासीन धोरणामुळे तर कधी त्याच्या शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त नुकसान सहन करावी लागते. असं असेल तर शेतकरी आर्थिक सक्षम होणार तर कधी?

(संपादन - गणेश पिटेकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com