फुलंब्री - छत्रपती संभाजी नगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आळंद परिसरामध्ये एका ट्रकने दुचाकीला सुमारे शंभर फूट फरपटत नेऊन एकाच कुटुंबातील तिघांना चिरडल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) चार वाजेच्या सुमारास घडली आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे..गोपालसिंग मंगलसिंग चंदनशे (वय-३५), ऋदय गोपाल चंदनशे (वय-८ वर्ष), अवनी गोपाल चंदनशे (वय-९ वर्ष) असे अपघातात ठार झालेल्या एकाच कुटुंबातील तिघांची नावे आहेत. तर मीना गोपालसिंग चंदनशे सदरील महिला गंभीर जखमी आहे..याबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजी नगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील आळंद परिसरामध्ये असणाऱ्या गणपती मंदिराजवळील साताळ फाट्याजवळ आळंद कडून सिल्लोड महामार्गाने गावाकडे दुचाकी क्रमांक एम एच. ०२, सीसी ०२६३ ने जात असताना सिल्लोड कडून भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच.१९, सी एक्स २३७८ ने समोर वळणाऱ्या दुचाकीला सुमारे 100 फूट फरपटत नेऊन तिघांना चिरडले आहे..तर दुचाकीवर असणारी पत्नी बाजूला फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाली आहे. सदरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडोद बाजार पोलीस ठाण्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती..यावेळी महात्मा फुले क्रीडा मंडळाचे रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी सदरील चौघानाही फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांना तपासून मृत घोषित केले आहे.त्यामुळे गोपालसिंग मंगलसिंग चंदनशे, अवनी गोपालसिंग चंदनशे, अवनी गोपालसिंग चंदनशे, हे तिघे ठार झाले आहे. तर मीना गोपाल सिंग चंदनशे ही महिला गंभीर जखमी आहे. या घटनेची वडोद बाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.