

Jalna News
esakal
घनसावंगी: चालू वर्षाचा साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंबड, घनसावंगी तालुक्यातील कारखान्यांची धुराडी थांबण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिल्लक राहिलेल्या उसाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कारखाने येत्या पंधरा दिवसांत उर्वरित उसाचे गाळप करून हंगाम संपविणार आहेत.