हिंगोली जिल्ह्यात हिवताप, डेंग्यु आजाराचे सर्वेक्षण

हिवताप डेंग्यु, चिकनगुनिया या आजाराबाबत नागरीकांना आरोग्य शिक्षण जनजागृती करण्यात येत आहे. तसेच आठवड्यातुन एक दिवस ( शनिवार ) या दिवशी घरातील सर्व सांडपाण्याचे भांडे धूवुन. पूसुन कोरडे करुन ठेवावे.
हिवताप, मलेरिया
हिवताप, मलेरिया

हिंगोली : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रन कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप अधिकारी कार्यक्षेत्रात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत हिवताप व डेंग्यु या आजाराचे सर्व्हेक्षण व जनजागृती जिल्ह्यात करण्यात येत आहे. तसेच घरोघरी जाउन कंटेनर सर्वेक्षण करुन लारव्हा आढळलेल्या दुषीत भांड्यात अबेट टाकण्यात येत असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली.

दरम्यान हिवताप डेंग्यु, चिकनगुनिया या आजाराबाबत नागरीकांना आरोग्य शिक्षण जनजागृती करण्यात येत आहे. तसेच आठवड्यातुन एक दिवस ( शनिवार ) या दिवशी घरातील सर्व सांडपाण्याचे भांडे धूवुन. पूसुन कोरडे करुन ठेवावे. अशाप्रकारे नागरीकांना सांगण्यात येत आहे. सन २०२०- २१ मध्ये ग्रामपंचायतच्या मागणीनुसार ३४ गावात धुरफवारणी करण्यात आली, रक्तजल नमुने ४८ घेण्यात आले तसेच या कार्यालयांतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून २५ धुरफवारणी यंत्रे खरेदी करण्यात आले होते. सदर धुरफवारणी यंत्र जिल्ह्यातील २४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक याप्रमाणे असे २४ धुरफवारणी यंत्र या कार्यालयामार्फ वाटप करण्यात आले आहे.

हेही वाचा- उपविभागीय पोलिस अधिकारी वसीम हाश्मी यांनी स्वतः गीत गायन करुन नागरिकांना कोरोना बाबतचे निर्बंध पाळण्याचे आवाहन केले. वसमत शहरातील प्रमुख चौकात त्यांच्या गायनाचा आगळावेगळा कार्यक्रम पहावयास मिळाला.

ग्रामपंचायतच्या मागणीप्रमाणे धुरफवारणी सबंधीत गावात करण्यात येते. सबंधी गावात धुरफवारणी करण्यासाठी लागणारे डिझेल व पेट्रोलची व्यवस्था ही ग्रामपंचायत मार्फत करण्यात येते. कार्यालयातील तांत्रीक विभागात ग्रामपंचायतकडुन धुरफवारणी मागणी अर्ज प्राप्त होताच त्वरीत या कार्यालयाचे कर्मचारी यांचे मार्फत धुरफवारणी करण्यात येते.

तसेच जिल्ह्यातील संपुर्ण गावात नियमित कंटेनर सर्वेक्षण करण्यात येते. हिवताप, डेंग्यु रुग्ण आढळलेल्या गावात जलद ताप सर्वेक्षण व अबेटींग करण्यात येते तसेच दर वर्ष पावसाळा सुरु होण्यापुर्वी व नंतर विशेष अॅबेटींगचे दोन आठवडे घेण्यात येतात. यामुळे हिवताप, डेंग्यु या अतीसारण प्रतिबंध होतो तरी जिल्ह्यातील नागरीकांनी आपल्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवावा. तुंबलेल्या नाल्या वाहत्या करावे, टायर, नारळांचे करवंटया, कुंडया, साचलेले गटारमध्ये, जळके ऑईल किंवा रॉकेल टाकावे. पावसाळ्यामध्ये गावतील मोठे गटार तसेच पडीत विहीर यामध्ये डासअळी भक्षक गप्पीमासे सोडण्यात येतात त्यामुळे हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया या सारखे आजारांना आळा बसतो असे सांगितले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com