टाकरवण: निसर्गाचा लहरीपणा आणि वातावणातील बदलाचा परिणाम रानमेवा असलेल्या जांभळांवरही झाला असून, बाजारात गावरान जांभळांची आवक कमी झाली आहे..निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा जांभुळ उत्पादनात मोठी घट झाली आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे जांभूळ उत्पादनास फटका बसल्याने गावरान जांभूळ दुर्मिळ झाले आहेत..Hamirpur Bridge Collapse : भीषण दुर्घटना ! वादळामुळे निर्माणाधीन पूल कोसळला, ६ मजुरांचा दुदैवी मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती.वृक्षतोडीने जुनी जांभळाची झाडे कमी झाली आहेत. या वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे.त्यामुळे गावरान जांभळाचा आस्वाद दुर्मिळ झाला आहे. सध्या बाजारात जांभळाला मागणी आहे; मात्र उत्पादन कमी झाल्याने ग्राहक महाग का होईना ते खरेदी करत आहेत..गतवर्षी जांभूळ ७० ते ८० रुपये किलो विकले होते. यंदा मात्र १२० ते १६० रुपये एक किलो जांभळासाठी मोजावे लागत असल्याचे चित्र आहे..Water Leakage: बिबी लघुपाटबंधारे प्रकल्पाला गळती; लाखो लिटर पाणी वाया, शेतकरी संतप्त."माझ्या शेतात जांभळाची झाडे आहेत; परंतु यंदा वातावरणातील बदलामुळे झाडाला फळधारणा कमी आहे. यामुळे फक्त २० ते ३० टक्केच फळ हाताशी आले आहे."- मारोती मस्के, जांभूळ उत्पादक.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.