Haribhau Bagade : अंत्यविधी आधी श्रद्धांजली वाहता येते का? आणि अध्यक्ष महाराज धोतर वर करून पाणी पाहत होते – अजितदादांचे प्रश्न आजही स्मरणात

अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे भावूक झाले.
Haribhau Bagade and Ajit pawar

Haribhau Bagade and Ajit pawar

sakal

Updated on

फुलंब्री - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या बुधवारी झालेल्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली जाण्याने एक स्पष्टवक्ता, शब्दाला टिकणारा आणि माणुसकी जपणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे भावूक झाले.

राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले की, 'मी २०१४ ते २०१९ या कालावधीत विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. त्या काळात सभागृहात अजितदादांचा वावर नेहमीच थेट, मुद्देसूद आणि प्रामाणिक असायचा. ते कधीही वाईट हेतूने किंवा संकुचित भावनेने टीका करत नसत.'

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com