

धाराशिव : येडशीच्या दक्षिण भागातून वाघ रेस्क्यू टीमला चकवा देऊन उत्तर भागात गेला आहे. बार्शी तालुक्यातील उक्कडगाव हद्दीत त्याने शुक्रवारी सायंकाळी तीन जनावरांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तिन्ही जनावरे दगावली. ही माहिती समजताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, चौथ्या दिवशीही रेस्क्यू टीमला वाघाला पकडण्यात यश आले नाही.