ईस्लापूर - किनवट तालुक्यातील बिलोरी–धानोरा घाटात मालवाहू ट्रक झाडाला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (ता.१०) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली..बिलोरी–धानोरा घाटातून जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळला. या अपघातात गोविंद लक्ष्मण शिंगेवाड (वय ५०, रा. शेंबोली, ता. मुदखेड) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दत्ता बालाजी तेलंग (वय ४८, रा. गोंडगाव) हे गंभीर जखमी झाले..अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान काही प्रवाशांनी १०८ रुग्णवाहिकेला फोनद्वारे संपर्क केला होता; मात्र ती वेळेत न आल्याने एका व्यक्तीचा जीव गमावल्याची चर्चा परिसरात आहे..धानोरा घाटात उताराचा व वळणावळणाचा रस्ता असल्याने काही वाहनचालक वाहनांचा वेग जास्त ठेवतात. त्यामुळे वाहनांचे संतुलन बिघडून वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणीही स्थानिकांकडून होत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.