अहमदपूर - गोताळा (ता. अहमदपुर) शेतात भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी गेलेल्या आठ जणांवर विज पडल्यामुळे दोघांचा मृत्यु झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. २६) सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे. .तालुक्यात मागील दहा दिवसापासून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे, सोमवारी सायंकाळी विजेच्या कडकड़ाटासह जोरदार वारा व पावसाला सुरूवात झाली. गोताळा येथील विक्रम सोपान कारले या शेतकऱ्यांच्या शेतात भूईमुगाच्या शेंगा काढल्या जात होत्या, पाऊस सुरु झाल्यामुळे हे मजुर झाडाच्या खाली येवून थांबले असता या झाडावर विज पडली..यात रंजना बळी समुखराव (५५ वर्ष), विक्रम सोपान कारले (५५ वर्ष) यांचा जागीच मृत्य झाला. तर अर्पिता भास्कर कांबळे (वय २०), महेश विक्रम कारले (३० वर्ष), कविता महेश कारले (२६ वर्ष), महानंदा सुखाचार्य सूर्यवंशी (५५ वर्ष), बालिका धनराज कांबळे (३५ वर्ष), आरती केशव जाधव (२१ वर्ष) हे गंभीर जखमी झाले आहेत..त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी रुग्णालयात येवून जखमींची भेट घेतली व जखमीना पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठविण्याच्या सूचना केल्या.त्यानुसार जखमींना लातूर येथील विलासराव देशमुख वैदयकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. मंजूषा लटपटे, तहसीलदार उज्वला पारंगकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे..शेतमालकाचा मृत्यु मुलगा व सून जखमीविज पडल्यामुळे शेतमालक विक्रम कारले यांचा मृत्यु झाला आहे. तर मुलगा महेश व सुन कविता हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना लातूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.