शिवना - सिल्लोड तालुक्यातील वडाळी येथे बुधवारी (ता. एक) दुपारी झालेल्या अवकाळी पावसात बांबुच्या बेटाला बांधलेल्या बैलांवर वीज कोसळून दोन बैल जागीच ठार झाले..बुधवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान ही घटना घडली. अजिंठा डोंगररांगांच्या माथ्यावर वडाळी हे आदिवासी बहुल गाव आहे. वडाळी शिवारात नामदेव भागाजी जाधव या वृद्ध शेतकऱ्याची अवघी अडीच एकर कोरडवाहू शेती आहे. दुपारी वैरण- पाणी करून त्यांनी चिंचेच्या झाडाशेजारील बांबुच्या बेटाला सावलीच्या आसऱ्याने बैल बांधले होते. शेजारच्या शेतात पूर्वमशागतीचे काम करत असताना अचानक वातावरणात बदल होऊन पाऊस सुरू झाला..या धावपळीत बैल सोडण्यासाठी जात असताना अचानक वीज कोसळली. त्यात श्री. जाधव हे बालंबाल बचावले. मात्र, या नैसर्गिक आपत्तीत दोन्ही बैल जागीच ठार झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास भरपाई मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.