फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे गट क्रमांक 273 मध्ये शेत वस्तीवर राहणाऱ्या दोन चव्हाण कुटुंबाचे स्वयंपाक सुरू असताना अचानक लागलेला आगीत घर जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (ता.२४) रोजी घडली आहे.
या संसार उपयोगी साहित्यसह रोख रक्कम, दागिने, धान्य, कपडे आदि जळून खात झाल्याने दोन्ही चव्हाण कुटुंबाचे सुमारे आठ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे. त्यामुळे या दोन्ही कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे गट नंबर 273 मध्ये शेत वस्तीवर संतोष साहेबराव चव्हाण व साहेबराव शेकू चव्हाण हे हे दोन कुटुंबे राहत होते. वर पत्र आणि खाली कुडाचे घर होते.
बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान गॅस सिलेंडर वर स्वयंपाक करत असताना अचानक घराच्या कुडाला आग लागल्याने आगीने रोद्रा रूप धारण केले. या आगीत दोन्ही घरे जळून खाक झाली. शेजारी - शेजारीच घरी असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.
सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याची टंचाई आहे. या आगीमध्ये संतोष साहेबराव चव्हाण यांचे संसार उपयोगी साहित्य, कपडे, दागिने, शिलाई मशीन, रोख रक्कम, कपाशी विकून आणलेले 50 हजार रुपये, चारा, शेती उपयोगी अवजारे, जळून खाक झाले आहे.
यात त्यांचे सुमारे तीन लाख 50 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. तर साहेबराव शकू चव्हाण यांचे सुद्धा संसार उपयोगी साहित्यासह शेतीचे अवजारे, कपडे, टीव्ही, इलेक्ट्रिक मोटार, कुट्टी मशीन, पीव्हीसी पाईप, जनावरांचा कुट्टी करून ठेवलेला चारा,
असे एकूण चार लाख 60 हजार रुपयांचे नुकसान साहेबराव चव्हाण यांची झाले आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबाचे आठ लाख दहा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेचा महसूल विभागाने पंचनामा केला असून यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आता परिसरातून शेतकरी करू लागले आहे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.