

Dharashiv News
esakal
उमरगा: शहराचा विस्तार झपाट्याने होत असला तरी, नागरी सुविधांबाबत मात्र आनंदीआनंदच आहे. शहराचा आठवडे बाजार आता गल्लीबोळातून थेट राष्ट्रीय महामार्गावर पोचला असून, यामुळे नागरिक आणि वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. दरम्यान, पालिकेकडे हक्काच्या जागा असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय गुंतागुंतीमुळे भाजीमंडईचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अधांतरीच आहे.