Hingoli Accident: बारावीचा पेपर देऊन परतणारे दोन विद्यार्थी अपघातात ठार
Road Accident: वसमत तालुक्यात बाराशिव शिवारात बारावीची परीक्षा देऊन परतणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत तिसरा विद्यार्थी गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत; घटनेमुळे आडगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
वसमत, (जि. हिंगोली) : बारावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अपघात होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना वसमत तालुक्यातील बाराशिवजवळ बुधवारी (ता. १८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.