

Beed News
esakal
बीड: जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. या वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका आता रस्त्यावरील वाहनांना बसताना दिसत आहे. कडक उन्हामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने दक्षता घेणे गरजेचे झाले आहे.