दुष्काळाच्या गडद छायेत परतूर तालुक्यात लाखो लिटर पाणी वाया

jalana
jalana

परतूर (जि.जालना)  : परतूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवहिनीला गळती लागून रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे नगर परिषद प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. परतूर शहराला पाडळी येथून निम्न दुधना प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येत असतो.  मुख्य जलवाहिनी परतूर मुख्य रस्त्यावर आहे. रमाकांत बरीदे यांच्या शेताजवळील या पाईप लाईनचा व्हॉल लिक झाल्याने लाखो लिटर फिल्टर केलेले पाणी वाया जात आहे.

सध्या परतूर तालुका दुष्काळाच्या गडद छायेत आहे. प्रकल्पात 22 टक्केच जिवंत साठा जिवंत आहे. असे असताना हे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. परतूर नगर पालिकेला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी नसल्याने हि अडचण निर्माण होत असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.

''परतूर शहरातील नागरिक सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहेत. शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणी येते. आणि पाणी जर अशा पद्धतीने वाया जात असेल तर. आगामी काळात मोठे पाणी संकट निर्माण होईल. पालिकेने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.'' 
- आजीस काजी, माजी नगरसेवक
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com