आडूळ - पैठण तालुक्यातील बारामाही दुष्काळाच्या झळा सोसणारे गाव म्हणून आडूळ बु. ओळखले जाते. आजघडीला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून तीव्र उन्हात महिलांसह शाळकरी मुलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे..मराठवाड्याची जीवन वाहिनी म्हणून पैठण येथील जायकवाडी धरणाची ओळख आहे. मात्र, पैठण तालुक्यातच भीषण पाणीटंचाई आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती आडूळ बु., आडुळ खुर्द, आडूळ तांडा, जामवाडी तांडा आणि शिवगड तांड्याची आहे..नागरिकांना पाच रुपये प्रति हंडा आणि ६० रुपये ड्रम याप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागते. आडूळ परिसरातील जलसाठे कोरडेठाक पडले असून विहिरींनी तळ गाठला आहे. पाणीटंचाई आणि चाऱ्याची मुख्य समस्या झाली असून जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सरकारने टँकर सुरू करावे पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे..पाण्याच्या मागण्यासाठी ग्रामस्थांनी मंगळवारी आमदार विलास भुमरे यांची भेट घेतली. गावात पाण्याचे टँकर सुरू करा, अशी मागणी केली. आमदार भुमरेंनी दखल घेत तीन गावांत टँकर सुरू करण्यास सांगितले. आता गावात टँकर सुरू झाले असून काही प्रमाणात ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. टॅंकरमधील पाणी सार्वजनिक विहिरीत सोडण्यात येते. पाणी नळाद्वारे वितरित करण्यात येणार आहे. तीन टँकरच्या सहा खेपांद्वारे पाणी देण्यात येणार आहे..‘सकाळ’च्या वृत्ताची दखलआडूळ येथील पाणीटंचाई संदर्भात ‘सकाळ’मध्ये वेळोवेळी वृत्त प्रकाशित करण्यात आले. याची दखल घेत प्रशासनाने मंगळवारीपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.भरउन्हात पाण्याच्या शोधात पायपीट करावी लागत आहे. डोक्यावर हंडे, हातात बकेट आणि काखेत लेकरू असा संघर्ष आम्हाला करावा लागत आहे.- शोभाबाई चव्हाण, आडूळ तांडा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
आडूळ - पैठण तालुक्यातील बारामाही दुष्काळाच्या झळा सोसणारे गाव म्हणून आडूळ बु. ओळखले जाते. आजघडीला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून तीव्र उन्हात महिलांसह शाळकरी मुलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे..मराठवाड्याची जीवन वाहिनी म्हणून पैठण येथील जायकवाडी धरणाची ओळख आहे. मात्र, पैठण तालुक्यातच भीषण पाणीटंचाई आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती आडूळ बु., आडुळ खुर्द, आडूळ तांडा, जामवाडी तांडा आणि शिवगड तांड्याची आहे..नागरिकांना पाच रुपये प्रति हंडा आणि ६० रुपये ड्रम याप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागते. आडूळ परिसरातील जलसाठे कोरडेठाक पडले असून विहिरींनी तळ गाठला आहे. पाणीटंचाई आणि चाऱ्याची मुख्य समस्या झाली असून जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सरकारने टँकर सुरू करावे पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे..पाण्याच्या मागण्यासाठी ग्रामस्थांनी मंगळवारी आमदार विलास भुमरे यांची भेट घेतली. गावात पाण्याचे टँकर सुरू करा, अशी मागणी केली. आमदार भुमरेंनी दखल घेत तीन गावांत टँकर सुरू करण्यास सांगितले. आता गावात टँकर सुरू झाले असून काही प्रमाणात ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. टॅंकरमधील पाणी सार्वजनिक विहिरीत सोडण्यात येते. पाणी नळाद्वारे वितरित करण्यात येणार आहे. तीन टँकरच्या सहा खेपांद्वारे पाणी देण्यात येणार आहे..‘सकाळ’च्या वृत्ताची दखलआडूळ येथील पाणीटंचाई संदर्भात ‘सकाळ’मध्ये वेळोवेळी वृत्त प्रकाशित करण्यात आले. याची दखल घेत प्रशासनाने मंगळवारीपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.भरउन्हात पाण्याच्या शोधात पायपीट करावी लागत आहे. डोक्यावर हंडे, हातात बकेट आणि काखेत लेकरू असा संघर्ष आम्हाला करावा लागत आहे.- शोभाबाई चव्हाण, आडूळ तांडा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.