

Jalna News
esakal
विष्णू नाझरकर
जालना: ऐन उन्हाळ्यात येथील जिल्हा परिषद, समाज कल्याण, पोलिस अधीक्षक या शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोयच नाही. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या शेकडो नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
परिणामी अभ्यागतांना तहान भागवण्यासाठी बॉटलचे पाणी विकत घेऊन भुर्दंड सोसावा लागत आहे. दरम्यान, कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी जारचे पाणी मात्र सर्वसामान्यांची हेळसांड होत आहे. नेत्यांसह अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयातच पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.