

जळकोट: वाढत्या उन्हाची तीव्रता आणि कोरडे पडत चाललेले नैसर्गिक जलस्रोत यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ही भटकंती रोखण्यासाठी वनपरिक्षेत्र विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वन विभागाकडून अतनूर, गव्हाण, रावणकोळा, डोंगरगाव, तिरुका या वनक्षेत्रांतील कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती आता थांबणार आहे.