आष्टी (जि. बीड) - सुमारे अडीच लाख घेऊन लग्न केले आणि तीन महिन्यांतच नववधू पसार झाल्याचा प्रकार आष्टी तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे..हिंगणी (ता. आष्टी) येथील एका मुलाचे लग्न होत नव्हते. ओळखीच्या असलेल्या मनीषा नेमीचंद्र अग्रवाल (रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) हिने एक मुलगी लग्नासाठी असल्याचे त्याला सांगितले. त्यासाठी मुलीच्या कुटुंबाला दोन लाख ४० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.ही बोलणी झाल्यानंतर एके दिवशी गौतम रामभाऊ खिल्लारे (रा. उमरखेड, जि. यवतमाळ) हे मुलीचे मामा, तर छाया बाजीराव वंजारे (रा. पुसद, जि. यवतमाळ) ही मावशी असल्याचे भासवून विमल श्रीकृष्ण आंबेकर (रा. पुसद, जि. यवतमाळ) हिला (वधू) घेऊन हिंगणी येथे आले. त्यांनी मुलगी दाखवून लग्नाची तयारी दर्शवली..ठरल्याप्रमाणे दोन लाख ३० हजार रुपये रोख घेतले तर १० हजार रुपये मनीषा अग्रवाल हिला ऑनलाइन पद्धतीने दिले. १२ जुलै २०२५ ला विवाह झाला. लग्नानंतर विमल संशयास्पद वागत होती. दरम्यान, मुलीच्या आजारी वडिलांचे निधन झाले आहे, असे सांगून गौतम खिल्लारे हा २७ ऑक्टोबर २०२५ ला तिला घेऊन आपल्या गावी गेला..त्यानंतर अनेकदा संपर्क साधूनही ती परतली नाही. चौकशीत लग्न अन् तिचे सगळे नातेवाईक बनावट असल्याचे समोर आले. फसवणूक केल्याप्रकरणी चौघा संशयितांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.