जिंतूर - तालुक्यातील मानधनी येथील तरुण शेतकरी आपल्या दैनंदिन कामासाठी आवराआवर करत असताना घराच्या पत्रात उतरलेल्या विज प्रवाहाचा धक्का बसल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २४) सकाळी सहाच्या सुमारास घडली. कृष्णा तातेराव जाधव (वय-२७ वर्षे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.