'देव तारी त्याला कोण मारी'; तब्बल १८ हजार जणं कोरोनाच्या उंबरठ्यावरुन आले परत...   

good news
good news
Updated on

मुंबई: कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना कोरोना होण्याची जास्त भिती असते. त्यामुळे अशा व्यक्तींचे विलगीकरण केले जात आहे. झोपडपट्ट्या चाळींमध्ये राहणाऱ्यांचे महापालिकेच्या केंद्रात विलगीकरण केले जात असून अशा १८ हजारहून अधिक जणांचा विलगीकरणाचा कालावधी  संपला आहे.

कोरोना रुग्णांच्या निकटच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना विषाणूंची बाधा होण्याची जास्त शक्यता असते. इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटूंबाचे शक्यतो त्यांच्या घरातच विलगीकरण केले जाते. मात्र, झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे केंद्रांमध्ये विलगीकरण केले जात आहे. साधारण १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी असतो.

महापालिकेने आता पर्यंत ३१ हजार ०७ जणांना विलगीकरण केंद्रात दाखल केले होते. त्यातील १८ हजार ८१३ जणांचा विलगीकरणाचा कालावधी पुर्ण झाला आहे. तर सध्या १२ हजार ९९४ व्यक्ती विलगीकरण केंद्रात दाखल आहेत.

महापालिकेने एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरावड्या पर्यंत विलगीकरण केंद्रात १२ हजार खाटा तयार केल्या होत्या. मात्र,रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर १५ दिवसात ही क्षमता ३० हजारा पर्यंत वाढवली आहे. सध्या विलगीकरण केंद्रात ३० हजार ५९७ खाटा तयार आहेत.

कोरोनाच्या विषाणूची बाधा झाल्यानंंतर ५-६ दिवसात आजाराची लक्षणं दिसू लागतात. जास्तीत जास्त १४ दिवसात लक्षणंं दिसतात त्यामुळे १४ दिवस विलगीकरण केलं जातं.

18 thousand people went to their home from quarantine centre read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com