
मुंबई : शालेय शिक्षण विभागाने पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात केली आहे. या निर्णयानंतर शाळा परीक्षा कशा आणि किती गुणांच्या घ्यायच्या याबाबत संभ्रमात आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने घटक चाचणीबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होऊ लागली आहे. यामध्येच शिक्षण विभागाच्या आदेशाची वाट न पाहता काही शाळांनी ऑनलाईन घटक चाचणी घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे घटक चाचणीबाबत पालक, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने ऑनलाइन शाळा सुरू केल्या आहेत. त्यानुसार शाळा विद्यार्थांना ऑनलाईनद्वारे शिक्षण देत आहेत. शाळा उशीराने सुरू झाल्याने शिक्षक संघटनेकडून सीबीएसईप्रमाणे अभ्यासक्रम कपात करण्याची मागणी सरकारने विलंबाने मान्य केली. मात्र आता अनेक शाळांना ऑनलाईन घटक चाचणी घेण्याची तयारी सुरू केली आहे. ऑनलाईन शिक्षण अद्यापही सर्वांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे चाचणी नको असा सूर पालक व शिक्षकांमधून उमटत आहे.
शाळेत प्रथम व द्वितीय सत्रात प्रत्येकी एक घटक चाचणी घेतली जाते. ही परीक्षा लेखी असल्याने ती सध्या घेणे शक्य नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घटक चाचणी परीक्षा व सत्र परीक्षा कशी व किती गुणांची घ्यायची, मूल्यांकन पद्धत कशी असेल याबाबत शिक्षण विभागाने तातडीने स्पष्टता आणावी अशी मागणी टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी केली आहे. तसेच ऑनलाईन शिक्षण सर्वांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे ऑनलाईन चाचणी नको, अशी मागणी होत आहे. त्यामुळे याबाबतीत तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.
-----------------------------------------------------
Editing Tushar Sonawane
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.