कल्याण : गांधारी पूल धोकादायक आहे की नाही ?

खांबाच्या त्या एका भागाने निर्माण केलाय संभ्रम
gandhari pool
gandhari poolsakal
Updated on

कल्याण : पुरजन्य परिस्थितीनंतर केलेल्या पहाणी दरम्यान गांधारी पुलाच्या (Gandhari bridge) एका खांबाला नुकसान झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. नक्की माहिती मिळत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी रात्रीतल्या रात्रीत हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मंगळवारी बांधकाम विभाग पुलाची पहाणी करून निर्णय घेणार होते. मात्र, दुपारी 12 वाजले तरी बांधकाम विभागास बोट उपलब्ध न झाल्याने पाहणीत अडथळा निर्माण झाला. अखेर बुधवारी तज्ञांच्या उपस्थितीत या पुलाची पहाणी करण्याचा निर्णय विभागाने घेतल्याने पूल धोकादायक आहे की नाही याविषयीचा संभ्रम उद्या सुटेल अशी शक्यता आहे. (after flood Gandhari bridge dangerous or not)

ग्रामीण परिसरात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्याने पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊन नद्याही दुथडी भरून वहात होत्या. पाण्याच्या या प्रवाहामुळे गांधारी पुलाच्या खांबाला नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाली होती. रात्रीची वेळ असल्याने मंगळवारी सकाळी तांत्रिक अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञ व्यक्ती येऊन या संपूर्ण पुलाची पाहणी करण्यात येईल अशी भूमिका बांधकाम विभागाने घेतली होती. पुलाच्या त्या संभ्रमवीत खांबाकडे जाण्यासाठी विभागास बोट हवी होती.

बोट रात्रीच बुक करून ठेवल्याचे अधिकारी सांगत होते मात्र मंगळवारी दुपारी 12 वाजून गेले तरी बोट उपलब्ध होत नसल्याने तसेच अधिकारी वर्ग नसल्याने पहाणी रद्द झाल्याचे सुरवातीला अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र नंतर 1.30 च्या सुमारास स्थानिक अधिकाऱ्यांनी जाऊन खांबाची पहाणी केल्याचे अधिकारी सांगतात. बुधवारी तज्ज्ञांकडून या पुलाची पहाणी करण्यात येणार असल्याने उद्याच पुल धोकादायक आहे की नाही हा प्रश्न सुटेल.

भिवंडी बायपासवर वाहतूकीचा ताण

सोमवारी रात्रीपासून गांधारी पुलावरील वाहतूक बंद केल्याने कल्याणहून पडघा, नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना भिवंडी बायपासमार्गे वळसा घालून जावे लागत आहे. भिवंडी बायपास मार्गाचेही काम सुरू असल्याने वाहतुक धिम्या गतीने सुरू आहे. भिवंडी बायपासचा पूर्ण वळसा वाचविण्यासाठी गांधारी पूल हा जवळचा रस्ता असल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत.

  • उल्हास नदीवरील गांधारी पूल हा 1999 साली वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

  • 222 मी लांबीचा हा पूल आहे.

  • बापगाव, चौधरपाडा, सावध, सोनारे, लोनाड, किताडे, मुथवण यांसारख्या गावांचा पूल बंद झाल्याने कल्याणशी संपर्क तुटला आहे.

  • गांधारी पुलाशिवाय कल्याण मध्ये येण्यास दुसरा मार्ग नसल्याने जवळपास राहणारे नागरिक पुलावरून पायी चालत प्रवास करीत होते.

याबाबत कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागचे उपअभियंता प्रशांत मानकर यांनी सांगितले, 'मंगळवारी दुपारी दुर्गाडी येथून बोटीची व्यवस्था झाल्यानंतर पहाणी करण्यात आली. प्राथमिक पहाणीमध्ये खांबाचे जास्त नुकसान झाले नसल्याचे दिसत आहे. मात्र, उद्या तज्ञांच्या मार्फत पहाणी करूनच निर्णय घेण्यात येईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com