नवी मुंबई विमानतळ नामकरणानंतर 18 गावे वगळून पालिका निवडणूक लावा

27 गाव संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
election
electionsakal

डोंबिवली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास पाठिंबा दर्शविल्याने 27 गाव संघर्ष समितीने आनंद व्यक्त केला आहे. दि. बा. पाटील हे 27 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष होते. त्यांची इच्छा होती की 27 गाव कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून वगळण्यात यावी. येत्या निवडणूकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवडणूक आयोगासोबत बोलून 27 गावांतील 18 गावे वगळून निवडणूक लावावी अशी आमची मागणी असल्याचे संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविल्यानंतर रायगड, ठाणे जिल्ह्यातील भूमीपुत्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 27 गाव संघर्ष समितीने देखील याबद्दल आनंद व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. समितीचे सरचिटणीस पाटील म्हणाले, दि. बा. पाटील हे संघर्ष समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या काळातच विलासराव देशमुख यांनी 27 गावाच्या ग्रामपंचायती स्थापन केल्या होत्या. त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला आहे.

आमची मुख्यमंत्री ठाकरे यांना एक विनंती आहे की, दोन वर्षांपूर्वी 18 गावांची स्वतंत्र नगरपालिका घोषित केली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे निवडणूक आयोगा सोबत बोलून हि 18 गाव वगळून पालिकेची निवडणूक लावावी अशी आमची मागणी आहे. हा निर्णय झाल्यास दि. बा. पाटील यांना ती एक आदरांजली ठरेल असे देखील पाटील म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com