ajit pawar
sakal
मुंबई - राज्याची आर्थिक घडी बसवताना जनसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या आयुष्यात बदल करणारे क्रांतिकारक निर्णय घेताना अजित पवार यांनी कधी हात आखडता घेतला नाही. पाणीवाटपाचे धोरण ठरवताना पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिक वापरासाठी या उतरंडीने त्यांनी प्राधान्यक्रम ठरवले. ते उर्जा मंत्री असण्याच्या काळातच राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील वीज भारनियमन कमी झाले, शेतीला वीज देण्यासाठी स्वतंत्र ‘फेज’ही अजित पवार ऊर्जामंत्री असतानाच्या काळात पुरविण्यात आली.