बॉलिवूड आणि मुंबईचं रक्ताचं नातं; उर्मिला मातोंडकरांचे टीकाकारांना उत्तर

बॉलिवूड आणि मुंबईचं रक्ताचं नातं; उर्मिला मातोंडकरांचे टीकाकारांना उत्तर

मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे यावेळी दिली. बॉलिवूडमधील सध्याच्या ड्रग्स आणि इतर प्रकरणांवर उर्मिला यांनी आपले परखड मते मांडली.

बॉलिवूडला बदनाम करण्याचे कारस्थान केले जात असल्याचं उर्मिला यांनी म्हटले होते. योगी अदित्यनाथ यांनी बॉलिवूड उत्तरप्रदेशात नेण्याविषयी भाष्य केले होते. बॉलिवूड हा साधा शब्द असला तरी, बॉलिवूड आणि मुंबईचं रक्ताचं नातं आहे. हिंदी चित्रपट उद्योग आणि मुंबई वेगळे होण्याची शक्यता मला वाटत नाही. तरीही मला पूर्ण आशा आहे की, तिथे होणारी फिल्म सिटी उत्तम उभी राहील. माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. असंही उर्मिला यावेळी म्हणाल्या. अभिनेते अक्षय कुमार योगी अदित्यनाथ यांना फिल्म सिटीच्या संदर्भात भेटनार असल्याच्या मुद्द्यावर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. यावर त्यांनी प्रतिक्रीया देण्याचे टाळले. 

शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा तो फोन कॉल ठरला महत्त्वाचा

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधलं. पक्ष प्रवेशानंतर उर्मिला यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उर्मिला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी केलेल्या फोनबद्दल सांगितलं आहे. 

काँग्रेसकडून आलेली विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त कोट्यातील उमेदवारीही उर्मिला यांनी नाकारली होती.  शिवसेनेने उर्मिला यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून उमेदवारीची ऑफर दिली. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांना फोन केल्यानंतर त्यांनी विधान परिषदेसाठी होकार दिला होता.

'आपली जी विधान परिषद आहे महाराष्ट्राची. त्या महाराष्ट्राची परंपरा ही इतकी मोठी आहे की, त्याच्या मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचं सामाजिक आणि सांस्कृतिक दर्जा वाढावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. कारण की ही परिषद, या ज्या जागा आहेत, जी भवनं आहेत. त्याच्यात जायला लोकांना खूप मोठा प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्याचा दर्जा खूप वाढायला पाहिजे आणि त्याच्याकरिता तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे.'

उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा हे म्हणाले आणि विचारचं मला पहिल्यांदा खूप आवडले. तसंच त्यांनी माझा नावाचा विचार केला यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, असंही उर्मिला मातोंडकर म्हणाल्यात.

Blood ties between Bollywood and Mumbai Urmila Matondkars answer to the critics 

------------------------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com